ऐन वैशाखाच्या वणव्यातली १९८० सालांतली ती एक दुपार होती. जेवणंखाणं आवरून जरा आडवं व्हायची खरं तर ही वेळ. पण ’अजयभाऊं ’ च्या मंगळवार पेठेतल्या घरच्या दिवाणखान्यांत कॉंग्रेस पक्षाच्या शहर पातळीवरच्या कार्यकर्त्यांची बैठक भरलेली होती. सेक्रेटरी, खजिनदार, प्रवक्ते, कार्यकर्ते, अन् हौशे-नवशे-गंवशे, असली तीस चाळीस तरी मंडळी हजर होती. तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकांच्या मोर्चेबांधणीवर खलबतं चालूं होती. तोंडातले पानतंबाखूचे तोंबरे सांभाळत, जो तो हिरीरीनं बडबडत होता.
नमस्कार मित्रहो. अठरापगड पैलूंच्या माणसांच्या आयुष्यांत घडलेल्या नमुनेदार घटनांवर आधारलेल्या या लघुकथा. साहित्याच्या प्रथेनुसार स्थळांची नी माणसांची नावंगावं बदलली असली तरी या कथांतल्या घटना खर्याखुर्या माणसांच्या आयुष्यांत, माझ्या उपस्थितीत प्रत्यक्ष घडलेल्या. मानवी स्वभावांचे हे अजब नमुने पाहून त्या त्या वेळी कुणी ना कुणी आपल्या कपाळाला हात लावलेला आहे. या कथा वाचून आपणही थक्क होत स्वतःच्या कपाळाला हात लावाल ही अपेक्षा. ----- रविशंकर. २६ नोव्हेंबर २०११.
Search This Blog
Showing posts with label ॥ निराधार ॥. Show all posts
Showing posts with label ॥ निराधार ॥. Show all posts
Sunday, 27 November 2011
॥ निराधार ॥
Subscribe to:
Posts (Atom)
