||
नॉलेज
ईज पॉवर...
||
,”
तेव्हां
हे कायम लक्ष्यांत ठेंव
ॲरिस्टॉटल,
की…
…
नॉलेज
इज पॉवर,
ऍण्ड
ऍब्सोल्यूट नॉलेज इज ऍब्सोल्यूट
पॉवर… … समजलं नीट ?
”
माझे
आद्य गुरू श्री.
टिकेकर
मास्तर मला निरोप देतांना '
लिव्हिंग
एक्सलन्स '
कश्याशी
खातात,
ते
नीट समजावून सांगत
होते… …
मी,”
पण
मास्तर,
एखाद्याजंवळ
नुस्तं द्न्यान असून काय
उपयोग?
… … तो
जर काडी पैलवान असेल,
तर
त्याचा कसा काय निभाव लागेल
जगांत?…
… मला
नाही पटत तुमचं म्हणणं… … "
१९६९
सालातल्या जून महिन्यातली
ती एक पावसाळी कुन्द दुपार
होती… ...
उच्च
शिक्षणासाठी कोल्हापूरहून
पुण्याला प्रस्थान ठेंवण्याआधी
मी पेढे देऊन आशीर्वाद घ्यायला
माझे आद्य गुरू श्री.
टिकेकर
मास्तरांच्या घरीं गेलो होतो…
……
पेढे-
बिढे
देऊन मास्तरांनां नमस्कार
करतांच त्यांचा '
समृद्धो
भंव '
असा
तोंडभंर आशीर्वाद ऐकल्यावर
केलेल्या कष्टांचं सार्थक
झालेलं होतं… … …
मग
नेहमीसारखाच दुपारचा चहा
घेतां -
घेतां
गप्पांची मालगाडी आपसूकच
तत्त्वद्न्यानाकडं वळलेली
होती,
आणि
'
अमोघ
सामर्थ्य '
नेमकं
कश्याला म्हणतात,
या
मुद्यावर आमचा वाद पेंटला
होता………
मास्तर,”
माझ्या
वाक्याचा गर्भितार्थ असा
नाही… … "
मी,”
मग
कसा आहे ?”
तेव्हां
मग मास्तर त्यांच्या वाक्याचं
बरंच तात्त्वद्न्यानिक विवेचन
विशद करून अखेर म्हणाले होते,”
एक
छान सुभाषित सांगतो तुला,
ते
लक्ष्यांत ठेंव… …
तोंपावेतों
मास्तरांच्या समोर बसून मी
अगणित सुभाषितांची रसाळ
विवेचनं ऐकलेली असल्यानं,
त्यांनी
सुभाषित म्हणतांच मी जरा
संरसांवून बसलो… … …
मास्तर
बोलतच होते,”
तूं
आत्तां जो आक्षेप घेतलास ना
ॲरिस्टॉटल… तो अगदी बरोबर
आहे… … निव्वळ द्न्यान मिळवून
कुणालाच '
अमोघ
सामर्थ्य '
- ज्याला
'
इन्व्हिन्सिबल
पॉवर '
असं
इंग्रजीत म्हणतात-
ते
प्राप्त होत नसतं… …तर सुभाषित
असं आहे,
की...
||
शस्त्रशास्त्राधिकाराच्च
धनदेहबलाद्वरम्
अर्जितद्न्यानचारित्र्यादपराजेयसामर्थ्यम्
||
मी,”
बापरे...याचा
अर्थ काय मास्तर ?”
मास्तर,”
असा
विचार जर केला ऍरिस्टॉटल...की
मनुष्याला सामर्थ्य कश्याकश्यामुळं
प्राप्त होतं ?
तर
शस्त्रांमुळं,
शास्त्रांमुळं,
अधिकारपदामुळं,
धनसंपत्तीमुळं,
तसंच
शारीरिक म्हणजेच देहबलामुळं
असं ढोबळमानानं म्हणतां
येईल...बरोबर
?”
मी,”
अगदी
बरोबर मास्तर...”
मास्तर,”
आतां
या सगळ्यांची माणसाला सामर्थ्य
प्रदान करायची क्षमता ही
शास्त्र,
संपत्ति,
अधिकार,
शस्त्र,
आणि
शारीरिक बळ अशी उतरत्या क्रमानं
असते,
ही
पहिली गोष्ट… ...आलं
लक्ष्यात ?”
मी,”
हो...आलं
लक्ष्यांत मास्तर… ...”
मास्तर,”
आतां
यापैकी कांही किंवा सगळी
सुद्धां एखाद्याजंवळ असली,
तरीही
तो मनुष्य अपराजेय होईलच असं
नाही,
असंही
सुभाषितकार सांगतायत… …"
मी,”
म्हणजे
काय मास्तर ?…
… असं
कसं होईल ?
”
मास्तर,”
म्हणजे
असं,
की
ही सगळी च्या सगळी आयुधं जंवळ
असूनही माणसाजवळ प्रतिपक्षाचे
घांव निष्फळ करायला संपन्न
निष्कलंक चारित्र्याचं अभेद्य
चिलखत जर नसेल,
तर
जगाच्या रणांगणावर तो बघतां
बघतां चितपट व्हायला वेंळ
लागत नाही,
असंही
सुभाषितकार सांगतायत… …
…चारित्र्यहीन मनुष्य रणांगणावर
उतरण्यांआधीच लढाई हंरलेला
असतो…हे पक्कं ध्यानांत ठेंव…
तात्पर्य,
निष्कलंक
संपन्न चारित्र्याचं चिलखत
हे पाहिलं,
आणि
कुठल्याही विषयातल्या परिपूर्ण
द्न्यानाची पांजळलेली तलवार
हे दुसरं… …केवळ ही दोन अमोघ
शस्त्रास्त्रंच माणसाला '
अपराजेय
सामर्थ्य '
प्रदान
करूं शकतात,
हे
ही तत्त्व कायम लक्ष्यांत
ठेंव ॲरिस्टॉटल… …
या
दोन शस्त्रांमध्येही जर
तोळामासा फंरक करायचा झाला,
तर
विशुद्ध चारित्र्य हे निर्णायक
महत्त्वाचं...सम्यक्
द्न्यान हे त्यापांठोपांठ
… …आणि निर्णायक महत्त्वाचं
हे,
की
या यांतलं कुठलंतरी एकच प्राप्त
असूनही भागत नाही,
तर
ही दोन्ही शस्त्रास्त्रं
गांठीला लावलेली असतील,
तरच
तो मनुष्य अपराजेय होऊं शकतो…
…
आणि
कळीची महत्त्वाची गोष्ट अशी,
की
ही दोन्ही अमोघ शस्त्रास्त्रं
अर्जित म्हणजे प्रयत्नपूर्वक
अपार कष्ट करून कमावलेली असावी
लागतात...बसल्या
खाटल्यावर आयती पदरात पडत
नसतात.
पैकी
द्न्यान हे माणसाच्या
बुध्दि-चिंतनाशी
निगडित असतं,
तर
विशुद्ध चारित्र्य माणसाच्या
विवेक-आचरणावर
थेट अवलंबून असतं… …इथपर्यंत
समजलं ?
“
मी,”
होय...समजलं.”
मास्तर,”
आतां
ज्या माणसाजवळ निष्कलंक
चारित्र्य असतं,
पण
जरूर त्या क्षेतरातलं द्न्यान
नसतं,
त्या
मनुष्याचीही व्यवहारात
पदोंपदीं बेदम फंसवणूक होत
असते,
कारण
मुळात द्न्यान च जर नसेल,
तर
चुना-
तंबाखू
चोंळणारा अशिक्षित माणूसही
भंल्याभंल्यांना हातोहात
गंडा घालूं शकतो… … …हें
पण बरोबर
?”
मी,
“ होय...पटतंय
मला हें…”
मास्तर,”
तेव्हां
निष्कलंक चारित्र्याइतकंच
कुठल्याही क्षेत्रातलं
आमूलाग्र द्न्यान पंचवलेलं
असणं,
हें
ही निर्णायक महत्त्वाचं
असतं...आणि
या दोन्ही गोष्टी ज्याच्या
गांठीला असतील,
असा
माणूस कुठल्याही समरप्रसंगात
निरपवादपणे अपराजेय ठंरतो,
हें
कधीही विसरूं नकोस ऍरिस्टॉटल…”
मी
निरोप घेतांना मास्तरांना
परत वांकून नमस्कार केला…
आणि
माझ्या मास्तरांनी,”
अपराजेय
समृध्दो च भंव "
असा
दंणदंणीत आशिर्वादही मला
दिला… …
माझ्या
मास्तरांनी मला प्रदान केलेलं
हें अनमोल तत्त्वद्न्यान मी
त्यानंतर आजतगायत अखंडपणे
पाळलं…
विद्यार्थी
दशेत त्याची यथायोग्य पारितोषिकं
तर मला मिळालीच,
पण
नंतरच्या वैवाहिक आयुष्यातही
सौ.
इंदिराजी
नी तमाम घरादाराची आख्खी
जबाबदारी एकहातींच तंडाखेबंदपणे
निभावली,
आणि
मला हवं तें करायला पूर्ण
स्वातंत्र्य दिलं … तेंही
स्वतः ची नोकरी सांभाळून…
...
साहजिकच
पोंटांपाण्याच्या मूळ
अभियांत्रिकी व्यवसायाव्यतिरिक्त
मी निरनिराळ्या जंवळपास
पंचेचाळीस द्न्यानशाखांत
यथेच्छ विहरलो,
आणि
उत्तरायुष्यात मास्तरांनी
शिकवलेल्या '
अपराजेय
सामर्थ्यम् "
चे
शेंकड्यांनी अनुभंवही घेतले…
आ
s
s s s sगदी
बंद्या रुपयासारखे खंणाखंण
वांजवून घेतले… …तेंही
विसा-एकविसाव्या
शतकांत...
त्यातलाच
'
वैद्यकीय
'
रणांगणावरचा
हा एक जगावेगळा अनुभंव… … …
****************************************************************
मी,“
तर
इंदिराजी … …ही वैद्यकीय
क्षेत्रांतली भानगड नेमकी
काय आहे,
तें
सांगतो…"
१९९०
सालच्या
हिवाळ्यातल्या एका निवांत
दुपारीं आम्हां दोघांत सदर
विषयावर संभाषण चाललेलं होतं…
कारण
होतं,
कन्या
सौ.
मुग्धा
ऊर्फ बापू यांना वारंवार
होणारी थंडी ची बाधा,
जिच्यात
कैक महिन्यांच्या ऍलोपॅथीतल्या
औषधोपचारांनी कांही निर्णायक
फंरक पडत नव्हता,
ती
होमिओपॅथीच्या औ़धोपचारांनी
शेंवटी पंधरवड्यातच
उताराला
लागलेली होती… ...
सौ.
इंदिराजी
आतां संरसावून बसल्या
,“...हं...सांगा.”
मी,“
तर
काय असतं,
की
इतर सगळ्या क्षेत्रांप्रमाणं
वैद्यकीय क्षेत्रांत
पण व्यस्तलक्षणचिकित्सा-
म्हणजेच
ऍलोपॅथी,
आयुर्वेद,
समलक्षणचिकित्सा-किंवा
जिला होमिओपॅथी महणतात ती,
युनानी
चिकित्सा,
चुंबक
चिकित्सा,
नसदाबचिकित्सा-म्हणजेच
ऍक्युप्रेशर,
रंगचिकित्सा,
नाडीचिकित्सा,
नसटोंचणचिकित्सा-अथवा
ऍक्युपंक्चर,
इत्यादि
अनेक शाखा आहेत...
...”
सौ.
इंदिराजी
,“
हं...तर
मग ?”
मी,“
यातल्या
ऍलोपॅथीवाल्यांचा एक सर्वसाधारणपणे
दावा असा असतो,
की
ऍलोपॅथी वगळतां बाकीं सर्व
चिकित्सा या निरर्थक-म्हणजेच
बिनबुडाच्या आहेत...बरोबर
?
”
सौ.
इंदिराजी
,“
बरोबर...बरेच
ऍलोपॅथीवाले इतर चिकित्सांना
'
कुडबुड्या
चिकित्सा '
किंवा
'
क्वॅक्
मेडिसिन '
म्हणतात,
हें
खरंय...बरं
मग ?”
मी,“
आतां
मी गेलीं पंचवीस-तीस
वर्षं तरी होमिओपॅथी अभ्यासतोय...एक
व्यासंग म्हणून…पण मी या
सगळ्या चिकित्साशास्त्रांतल्या
कुठल्याही शाखेचा समर्थक-प्रचारक
नाही,
विरोधकही
नाही,
आणि
निंदक तर त्याहून नाही… …”
सौ.
इंदिराजी
,“
आश्चर्य
च म्हणायला हंवं हे…”
मी,“
त्यात
कसलंही आश्चर्य तुम्हांला
वाटायचं कांही कारण नाही
इंदिराजी...कारण
या प्रत्येक शास्त्राची आपापली
कांही बलस्थानं असतात,
आणि
कांही हतबलस्थानंही असतात,
असं
मी मानतो…”
सौ.
इंदिराजी
,“
म्हणजे
?...काय
म्हणायचंय नेमकं तुम्हांला
?”
मी,“
सांगतो...उदाहरणार्थ,
निर्वाणीच्या
प्रसंगीं लागणारे औषधोपचार,
आणि
शल्योपचार,
हीं
ऍलोपॅथी ची बलस्थानं … ...बरोबर
?”
सौ.
इंदिराजी
,“
अगदी
बरोबर…”
मी,“
पण
पिंडजन्य विकार -
म्हणजेच
कॉन्स्टिट्यूशनल डिसीझेस
– आणि आनुवंशिक विकार-
किंवा
हेरिडिटरी डिसीझेस
– या क्षेत्रांत ऍलोपॅथी
बहुतांशी हतबल ठंरते...
मुळात
रोग उद्भवूंच नये,
अशी
निरामय जीवनपध्दति कशी असावी,
याची
चिकित्सा फक्त आयुर्वेदातच
केलेली आहे,
तर
पिंडजन्य विकार,
जीर्ण
विकार,
आनुवंशिक
विकार,
हीं
होमिओपॅथी ची हातखण्डा
रणक्षेत्रं… ...इथपर्यंत
मामला क्लीअर ?”
सौ.
इंदिराजी
,“
हो...क्लीअर...निर्वाणीच्या
वेळीं ऍलोपॅथी च कामीं येते,
हें
खरंय… ...पण
एखादं उदाहरण देऊन सांगतां
येईल ?”
मी,“
त्यात
काय एव्हढं ?...बापू
ना वारंवार होणारी थंडी ची
लागण ही पिंडजन्य विकारांत
मोडते...म्हणून
तीवर ऍलोपॅथीतले उपचार लागूं
पडत
नव्हते,
जें
काम होमिओपॅथी नं केवळ दोन
आंठवड्यांत करून दांखवलं...आतां
मुळात अशी बाधा होऊच नये,
यासाठी
तिनं जीवनशैलीत काय बदल करायला
हंवेत,
तें
फक्त आयुर्वेद च सांगूं शकेल…
...आतां
समजलं सगळं ?”
सौ.
इंदिराजी,“...बरं
असं आहे होय हें सगळं...?”
मी,"अजून
विशद करून सांगतो...
...
समलक्षणचिकित्सा
-
म्हणजेच
जिला '
होमिओपॅथी
'
असं
म्हणतात,
ती
इतर वैद्यकीय शाखांपेक्षा
बरीच वेगळी चिकित्सा पध्दति
आहे...
...तिचं
मूलतत्त्व
असं आहे...
||
पृथक्पृथग्मनुष्याणां
प्रकृतिषु विभिन्नता
एकैव
रोगनाशाय युक्तं पृथकमौषधम्
||
सौ.
इंदिराजी,“
याचा
अर्थ काय ?”
मी,“
सांगतो...तर
सुभाषितकार असं सांगतायत,
की
प्रत्येक माणसाची प्राकृतिक
जडण घडण ही एकमेवाद्वितीय
असते,
म्हणून
एक च विकार असलेल्या प्रत्येक
रुग्णाला त्याच्या त्याच्या
प्रकृतिनुरूप
एकाच आजारासाठी वेगळं वेगळं
औषध योजावं लागतं,
तरच
त्याचा उपयोग होतो...
...आलं
ध्यानांत...?”
सौ.
इंदिराजी
,
“ म्हणजे
काय ?...
असं
कसं होईल ?”
मी,”
म्हणजे
असं,
की
....समजा
आपल्याला खोंकला झाला,
तर
आपले कुटुंब वैद्य – म्हणजेच
'
फॅमिली
डॉक्टर '
काय
करतात ?
“
सौ.
इंदिराजी
,”
काय
करतात म्हणजे काय ?...
...औषधं
देतात लिहून...”
मी,”
बरोबर...
...आतां
मला सांगा...की
जर आपण दोघेही खोंकला झालाय
म्हणून डॉक्टर कडं जर गेलो,
तर
ते साधारणपणे काय करतील?”
सौ.
इंदिराजी
,“
मला
तुमचं हे कोंड्यातलं बोलणं
कांही कळत नाहीये...काय
म्हणायचंय तुम्हांला ?”
मी,”
सांगतो...मी
असं विचारतोय,
की
दोघांनाही जर खोंकला च झाला
असेल,
तर,
डॉक्टर
आपणां दोघांना सारखीच औषधं
लिहून देतील,
की
वेगवेगळी देतील ?”
सौ.
इंदिराजी
,“
हे
काय विचारणं झालं ?
डॉक्टर
दोघांनाही खोंकल्याचीच औषधं
लिहून देणार...”
मी,”
बरोबर
?...तर
हे असं ऍलोपॅथीत च होतं...म्हणजे
खोंकला म्हटलं,
की
अमुक अमुक औषधं,
पोंटदुखी
म्हटलं,
की
तमुक तमुक औषधं...अशी
गणितं फक्त ऍलोपॅथीत च असतात...
होमिओपॅथी
त अशी गणितं नसतात...
”
सौ.
इंदिराजी
,“
नवल
च आहे...मग
कशी गणितं असतात होमिओपॅथी
त ?”
मी,”
सांगतो...होमिओपॅथीत
औषधं ही रोग्याची प्रकृती
आणि लक्षणवैशिष्ठ्यांनुसार
योजली जातात...म्हणजे
असं,
की
पन्नास रुग्णांना जर खोंकला
झाला असेल,
तर
प्रत्येक रुग्णासाठी सुयोग्य
औषध निरनिराळं असूं शकतं,
तसंच
पन्नास रूग्णांना जर निरनिराळे
विकार असतील,
तर
त्या सगळ्यांंसाठी रामबाण
असं एकच औषधही असूं शकतं...
... ...त्याला
होमिओपॅथीत '
सिमिलिमम
'
असं
म्हणतात...आणि
असं रामबाण औषध च फक्त रुग्णाच्या
विकारांचं समूळ उच्चाटन करूं
शकतं...
अगदी
कायमचं...
... ”
सौ.
इंदिराजी,“
... ... नवल
च म्हणायला हंवं हें सगळं...
एकाच
आजारावर वेगवेगळीं औषधं,
आणि
वेगवेगळ्या आजारांवर एक च
औषध...
...असं
कसं होईल म्हणते मी ?”
मी,“
असं
होतं,
याचं
अगदी साधं-सरळ
कारण हें आहे,
की
ऍलोपॅथी
आजारांवर औषधोपचार करते,
तर
होमिओपॅथी आजा-यांवर
औषधोपचार करते...
...आतां
समजलं सगळं नीट...?”
सौ.
इंदिराजी,“
खरंच...किती
जगावेगळं आहे ना हो हें सगळं
?...कधीतरी
अनुभंवून बघायला हंवा
हा चमत्कार...
...”
आतां
मी तंडकलो,“
अहो,
तें
बघायला तुम्हांला स्वतः च
आजारी पडावं लागेल...!!!...हौस
आलीय की काय तुम्हांला आजारी
पडायची ?...ऑं
?”
सौ.
इंदिराजी,“...अहो
तसं नव्हे हो...
...”
मी,“...
...तसं
नव्हे ?...मग
कसं काय ?”
सौ.
इंदिराजी
नी वाद अंगलट यायला लागल्यावर,“
तुम्हांला
ना...
...कांहीही
सांगण्यात कांही अर्थ नाही
"...म्हणत
माझ्या च टाळक्यावर खापर
फोंडून संभाषणातनं कांढता
पाय घेतला...!!
फक्त
त्यांनी अजाणतां म्हटलेलं,
भविष्यात
आम्हांला च अनुभंवावं लागणाराय,
एव्हढं
च तेव्हां तरी आम्हांला ठाऊक
नव्हतं...
...
ती
वेळ नियति नं आमच्यावर तब्बल
पस्तीस वर्षांनी कोंसळवली...
... ...
...............................................................................................................................
,“...अहो...अहो...उठा...
...अहो
उठा की लंवकर...आई
आई गं...”
मी
झोंपमोड होऊन डोंळे चोळत न्
जांभया देत पलंगावर उठून
बसलो...
बघतो
तर सौ.
इंदिराजी
पलंगाच्या कांठावर डावा पाय
गच्च धंरून विव्हळत बसलेल्या...
...वेदनांनी
चेहरा घामानं थंबथंबून दोन्ही
डोंळ्यातनं धारा लागलेल्या...
... ...!!!
माझी
उरली-सुरली
पेंग गायब होत डोळे खाडकन्
उघडले,
न्
त्यांचे दोन्ही खांदे धंरून
मी विचारलं...
...अहो...काय
झालंय काय तुम्हांला...
...ऑं
?”
सौ.
इंदिराजी
कण्हत उत्तरल्या,“
अहो,
गेल्या
तासाभंरापासून माझ्या डाव्या
पायातनं मरणांतिक संणका
मारायल्या लागल्यायत...पार
खुब्यापासुन पावलांपर्यंत
सगळा पाय दुखायला लागलाय हो...
...आई
आई गं...मेले
मेले...!!!”
मी
समोरच्या भिंतीवरचं घड्याळ
बघितलं...
...
तें
दि.
२२
जुलै २०२५ च्या अपरात्री ची
सव्वा दोन ची वेळ दांखवत होतं...
... ...!!!
तें
कांहीतरी पदनसशोथ-म्हणजेच
साएटिका-सारखं
दुखणं अचानक च उद्भवलेलं दिसत
होतं...
!!
माझ्या
तोंडाला जराशी कोंरड च पडायला
लागली...
काय
करायचं आतां ?
आणि
कोण हरी चा लाल धांवत येणार
होता असल्या आड वेळेला तें
निस्तरायला
?
बरं...जंवळच्या
कुठल्या रुग्णालयाकडं धांव
घ्यावी म्हटलं,
तर
तश्या आड वेळेला एक
तर घरासमोरच्या
कोंप-यावर
एकही रिक्षा दिसत नव्हती...आणि
दुसरं असं,
की
दिसली असती,
तरी
सौ.
इंदिराजीनां
धंड उभं देखील राहवत नव्हतं...काय
उपयोग होणार होता त्या रिक्षा
चा असून तरी ?
नशिबानं
अचूक डाव साधलेला दिसत होता
एकंदरीत...
...
आतां
तांतडीनं घरातच कांहीतरी
प्रथमोपचार करून सौ.
इंदिराजीं
च्या पायातल्या संणका थोड्याफार
तरी कमी होईतोंवर दुसरं कांहीही
करतां येण्यासारखं नव्हतं...
मी
मग घरातल्या होमिओ औषधिसंग्रहातलं
त्याक्षणीं जें सुचलं,
तें
औषध निवडून सौ.
इंदिराजी
ना ताबडतोब त्याची पहिली
मात्रा दिली,
' होतील
वेदना कमी...कांही
काळजी करूं नकां तुम्ही...हें
औषध घ्या,
आणि
पडा बघूं शांतपणे आतां...मी
आहे ना काय तें बघून घ्यायला
?'
असा
धीर देत पुढं दर पंधरा पंधरा
मिनिटांनी अश्या तीन मात्रा
दिल्या,
आणि
वाट बघत शांतपणे '
पुढं
काय करायचं?’
त्याचा
विचार करीत त्यांच्या शेंजारी
जागत बसून
राहिलो...
सुमारे
तासाभंरात सौ.
इंदिराजीं
च्या पायातल्या संणका ब-याच
कमी झाल्या,
आणि
त्यांना शांत झोंपही लागली...
...
सकाळीं
उठल्यावर मी बघितलं,
तर
सौ.
इंदिराजी
झोंपेतच होत्या...
मी
मग सकाळची चहा नाष्ट्याची
सगळी तयारी करून त्यांना
उठवलं,“...बोला...कसं
वाटतंय आतां ?”
सौ.
इंदिराजी,“
पुष्कळ
बरं आहे,
पण
संणका कांही पूर्ण थांबलेल्या
नाहीत"
मी,“
म्हणजे
औषध लागूं तर पडतंय ना?...अजून
दोन दिवस आहे हें च औषध सुरूं
ठेंऊ न् बघूं काय होतंय तें...सगळी
चिंता माझ्यावर सोडा तुम्ही,
न्
आराम करा फक्त...”
सौ.
इंदिराजी,“
अहो
पण मी च जर अशी आडवी पडले,
तर
माझ्या घराचं कसं काय होणार
?”
मी,“
पहिलं
हें तर
निस्तरूं...
... मग
बघूं घरातल्या रगाड्याचं कसं
काय करायचं तें...आधी
उठून चालतां येतंय काय तें
बघा फक्त...”
सौ.
इंदिराजी
नी धुणी वाळत घालायची काठी
मला आणून द्यायला सांगितली,
आणि
तिचा आधार घेत त्या कश्याबश्या
उठून उभ्या राहिल्या...
आणि
पहिलं पाऊल पुढं टांकतानांच
त्यांच्या डाव्या पायाचं
पाऊल निर्जीव झोंळण्यासारखं
खाली लोंबायला लागलं...!!!
तें
एक फूटभंर उंच उचलल्याशिवाय
त्यांना चालताच येई ना...
सौ.
इंदिराजीं
च्या डोंळ्यात आतां पाणी
तंरळलं,“
अहो...
आतां
हें
असलं अपंगत्त्व नशिबाला
येणाराय की काय माझ्या ?”
मी
त्यांना धीर दिला,“
हें
बघा...आतांपावेतों
वेदना तरी ओंसरणीला लागल्यायत
ना ?...तुम्ही
धीर सोडूं नकां फक्त...मातोश्री
आहेत ना सगळी काळजी वहायला
आपली...आपलं
काम फक्त नशिबाला आलेलं
धर्मयुध्द अखण्ड लढत राहणं...”
सौ.
इंदिराजी
आतां जराश्या कां होई ना
सांवरल्या,“
बापू
[
कन्या
सौ.
मुग्धा
]
ला
कांही फोन-बिन
केला होता काय तुम्ही ?”
मी,“
अजून
तरी नाही केलेला...
...करूं
काय लगेच ?”
सौ.
इंदिराजी,“
नको...
...तिच्या
घरचे महाव्याप आधीच तिच्या
डोक्यावर आहेत...शिवाय
गुंडाप्पा [
नात
चि.
दीक्षा
]
च्या
दहावी चा गदाडा पण लागलाय
तिच्या मागं...
...मी
बघते तिला कधी-कसं
कळवायचं तें...
...स्वयंपाकघरातली
अवस्था काय आहे ?”
मी,“
मी
नाष्टा तंयार करून ठेंवलाय...तुम्ही
तोंड-बिंड
धुवून घ्या,
मग
घेऊं नाष्टा उरकून...बरं
मिली-रसिका
[
चिरंजीव-सूनबाई
]
ला
तरी फोन करूं काय ?”
सौ.
इंदिराजी,“
काय
साधणाराय त्यांना फोन करून,
फक्त
त्यांच्या डोंक्यांना भुंगे
लावण्याव्यतिरिक्त ?...
...दहा
हजार मैलांवर इंग्लंडमध्ये
आहेत ते...
येऊं
शकतायत काय तासाभंरात इथं
?...
... ह्या
अश्या अवस्थेत आतां मला घरातलं
सगळं कसं काय जमणार...तें
एक मातोश्री च जाणे...”
इतकं
बोलून एक हताश सुस्कारा टांकत
सौ.
इंदिराजी
न्हाणीघराकडं काठी टेंकत
सावकाश गेल्या...
...
पण
दिलेल्या औषधाचा गुण यायला
सुरुवात झालीय हें बघितल्यावर
मग पुढचे दोन दिवस मी अर्ध्या
अर्ध्या तासांऐवजीं एकेक
तासाला मात्रा देत तें च औषध
सुरूं ठेंवलं...”
सौ.
इंदिराजी
कांठी टेंकत जरी चालूं शकत
होत्या,
तरी
घरातली कामं त्यांच्या
सूचना-देखरेखी
नुसार मग मी च अंगावर घेतलीं.
तिस-या
दिवशीं सायंकाळपर्यंत सौ.
इंदिराजीं
च्या खुब्यापासून खाली
गुडघ्यापर्यंतच्या संणका
अगदी सफाचट् नाहीश्या झाल्या,
गुडघ्याखालच्या
भागातल्या संणकांची तीव्रताही
थोडीफार निवळली,
पण
त्या संणका मात्र पूर्णपणे
थांबल्या नाहीत,
आणि
खाली लोंबणा-या
पावलातला जोरही कांही वाढे
ना.
तेव्हां
मग मी त्यांना म्हणालो,“
हे
बघा...दिलेलं
औषध काम तर करतंय...दिसतंच
आहे तें.
पण
आहे या परिस्थितीत कांही काळ
तरी तांतडीनं ऍलोपॅथी चे उपचार
घेतलेले बरे असं मला वाटतंय,
तेव्हां
डॉ.
कुंडल्यांना
आजच्या आज दांखवून बघूं या
काय म्हणतात तें...”
सौ.
इंदिराजी
'
ठीकाय
'
इतकं
च म्हणाल्या.
तासाभंरातच
आम्ही
आम्ही डॉ.
कुंडल्यानां
गाठलं,
न्
त्यांनी अस्थिरोगतद्न्याला
दांखवायचा सल्ला दिला,
म्हणून
मग आम्ही जंवळच्याच आश्वस्त
रुग्णालयात गेलो...
तिथं
आधी अनेकविध चांचण्या पार
पडल्या,
आणि
दुपारीं साडेचार वाजतां
पाठीच्या कण्याची क्ष किरण
प्रतिमा गोळा करून आम्ही
अस्थिरोगतद्न्यांना भेंटलो...
त्यांनी
सगळे चांचण्या अहवाल,
क्ष
किरण प्रतिमा वगैरे बघून
सांगितलं की...
'सौ.
इंदिराजीं
च्या कमरेच्या मणक्यातनं
पायाकडं जाणारी नस ही कमरेच्या
मणक्यात चेंपटली गेलेली असून
ती तांतडीनं शस्त्रक्रिया
करून मोकळी करावी लागेल ...
...नाहीतर
त्यांना कायमचं अपंगत्त्वही
येऊं शकेल,
तेव्हां
आजच्या आज च काय तो निर्णय
घेऊन रुग्णालयात दांखल
व्हा...उद्यां
सकाळीच सदर शस्त्रक्रिया
करून टांकूं...’
तें निदान ऐकून आम्ही सर्द च झालो...
आणि
डोंकीं भंणभंणलेल्या हंताश
अवस्थेत तसेच घरीं परतलो...
...
मी
कपाळाला हात लावला न् सौ.
इंदिराजीं
ना विचारलं,“...काय
करावं म्हणताय तुम्ही आतां
?”
आमच्या
सौ.
इंदिराजी
घराच्या बाबतीत कितीही हंळव्या
असल्या,
तरी
बाकीं सगळ्या बाबतीत मस्त
खंमक्या आहेत...,“
काय
करावं म्हणजे काय ?...कुणी
एक डॉक्टर असा हांदरवून टांकणारा
सल्ला द्यायला लागला,
तर
शंकेला जागा असते...तुम्ही
विजय भावजी नां ताबडतोब फोन
लावा...तें
काय म्हणतायत तें आधी बघूं,
आणि
मग च पुढं कसं-काय
करायचं तें ठंरवूं आपण...अगदी
अजून डझनभंर डॉक्टरांची मतं
घ्यायला लागलीं तरी कांही
हंरकत नाही...लावा
फोन विजय भावजी नां...”
मी
मग माझा लंगोटियार शाळामित्र
डॉ.
विजय
कर्नावट-जो
वैद्यक वाचस्पति आहे -
त्याला
प्रथम भ्रमणध्वनीवर सगळे
अहवाल रवाना केले,
न्
पांठोंपाठ दूरध्वनि लावला...
विजय,“
काय
झालंय रे नाना...इतके
कसले कसले अहवाल पांठवलेले
दिसतायत माझ्या भ्रमणध्वनीवर...म्हणून
विचारतो...बरे
आहांत ना दोघे ?...की
कुणी आजारी-बिजारी
पडलंय...?”
मी
मग त्याला घडलेलं सगळं इत्यंभूत
सांगितलं,
न्
विचारलं,“
यावर
तुझं स्पष्ट मत काय ते सांग
मला विज्या...
रुग्णालयात
आजच्या आज शस्त्रक्रियेसाठी
दांखल व्हायचं की नाही ?...
...आणि
दांखल होणं आवश्यक नसेल,
तर
मग काय करायचं ?”
'
मला
अहवाल नजरेखालनं घालायला दहा
मिनिटं दे...मी
च तुला उलट फोन करतो '
म्हणत
विजय नं संधान तोंडलं...
बरोबर
दहा मिनिटांनी त्याचा दूरध्वनि
आला.
तो
सौ.
इंदिराजीनी
च उचलला...,“
हं...बोला
भावजी...
मी
च बोलतेय...नाही
नाही...कांही
घाबरलेली-बिबरलेली
नाहीय मी...बोला
तुम्ही...तसं
कांही नाही हो...झालंय
असं,
की
त्या डॉक्टर चं ऐकून गळाठा
झालाय तुमच्या मित्राचा...
कळलं?...बाहेर
दिवाणखान्यात बसलेत कपाळाला
हात लावून...‘
ताबडतोब
बाडबिस्तरा बांधून रुग्णालयात
जायचं '
म्हणून
नुस्ता धोशा लावलाय त्यांनी
माझ्या मागं...त्यांनाच
सांगा आतां पुढं काय करायचं
तें...कांही
नाही हो भावजी...कान
सोनारानं च टोंचलेले बरे असतात
!!!...
...काय?”
इतकं
बोलून सौ.
इंदिराजी
नी भ्रमणध्वनि माझ्या हातात
दिला...,“
हं
घ्या...भावजी
च आहेत फोनवर...”
मी,“
हं
बोल विज्या...”
विजय,“
हें
बघ नाना...पहिली
एक गोष्ट नीट ऐकून ठेंव...
कांहीही
झालं तरी कुणी एक डॉक्टर सांगतोय
म्हणून मला विचारल्याशिवाय
शस्त्रक्रियेसाठी वहिनी ना
रुग्णालयात इतक्या तंडकाफंडकीं
दाखल करायला अजिबात जायचं
नाही...समजलं
?”
मी,“
अरे
बाबा...पण...
...”
विजय,“
तुला
मी चांगला ओंळखून आहे नाना...म्हणून
सांगतोय बजावून...
...मी
आहे ना भक्कम तुमच्या पाठीशी
?...चिंता
काय करायची तें माझ्यावर
सोड...आणि
काय सांगतोय तें नीट ऐक...
...”
मी
आतां जरा सैलावलो,“
हं
बोल बाबा...”
विजय,“
उद्यां
सकाळीं अकरा वाजतां गंगेशकर
रुग्णालयात पृष्ठकणाविशेषद्न्य
डॉ.
पागे
यांना जाऊन भेंटा...आत्तांच
मी फोनवर त्यांच्याशी बोलून
वहिनींची केस त्यांना सांगितलेली
आहे,
आणि
तूं पांठवलेले सगळे अहवाल पण
त्यांना पांठवलेले आहेत...त्यांना
जाऊन भेंटा,
आणि
तें जे काय मत देतील,
त्यावर
डोंळे झांकून तुम्ही विश्वास
ठेंवायला हंरकत नाही,
इतकी
त्यांची कीर्ति चांगली आहे...तें
काय म्हणतायत तें बघ,
आणि
मला फोन कर...
...आत्तां
तुला इतकंच सांगतो,
कीं
यात कपाळाला हात लावून हंताश
होण्यासारखं या
अहवालांत
मला तरी
कांहीही
दिसत नाहीय...”
मी
भ्रमणध्वनि बंद करून विजय
काय म्हणाला तें सौ.
इंदिराजी
नां सांगितलं...
...
सौ.
इंदिराजी,“...बघितलंत
?...मला
वाटत होतंच,
की
भावजी असंच कांहीतरी सांगतील
म्हणून...
...”
मी,“
अहो...पण
त्या असह्य संणका तर तुम्हांलाच
सहन कराव्या लागत होत्या ना
?...
...त्याचं
काय ?”
सौ.
इंदिराजी
मंद हंसल्या,“
काळजी
करूं नकां तुम्ही...कां
S
S S S S ही
होणार नाही मला...
...गुडघ्याखालचा
भाग अजून दुखतोय थोडासा...पण
ठीकाय एकंदरीत...भावजी
म्हणतायत तसं उद्यां सकळीं
डॉ.
पाग्यांना
दांखवून तें काय सांगतायत
तें भावजीं च्या कानांवर
घालूं,
आणि
मग काय तो अंतिम निर्णय घेऊंया...
...आणि
एक सांगूं ?”
मी
च आतां कपाळाला हात लावला...!!!,
“ हं...घ्या
बोलून एकदाचं काय ते...
...”
सौ.
इंदिराजी
परत हंसल्या,“
तुमचं
ना...कधी
कांही समजतच नाही बघा
मला...स्वतःला
कांहीही झालं,
तरी
सफाचट् बेफिकीर...आणि
मला जरासं कांही खुट्ट झालं,
की
कपाळाला हात लावून घरात येरझारे
सुरूं...
... ...
ही...ही
अशी माझी जितकी जीवतोड काळजी
करत बसता ना तुम्ही ?...त्याच्या
पंचवीस टक्के तरी स्वतःची
काळजी घ्यायचं बघा...बराच
त्रास कमी होईल माझा...
...कळलं
?”
असला
राखीव शालजोडीतला जोडा हांणून
सौ.
इंदिराजी
हंसत कांठी घेऊन त्यांच्या
शयनकक्ष्याकडं पसार झाल्या
...
...
झालं...आतां
आमच्या श्वानफंरपटीचा
पुढचा अध्याय सुरूं झाला.
ठंरल्यानुसार
दुस-या
दिवशीं सकाळीं साडेदहा वाजतांच
आम्ही गंगेशकर रुग्णालय
गांठलं...
तिथं
कुंभमेळ्यासारख्या उसळलेल्या
भाऊगर्दीतनं आधी चंवकशी
कक्ष्यात नांवं नोंदणी करून
तिथलीं ओंळखपत्रं गळ्यांत
लटकवून सतरा ठिकाणी विचारपूस
करीत आम्ही एकदाचे डॉ.
पाग्यांच्या
कक्ष्यात पावणे अकरा वाजतां
कसेबसे दाखल झालो...
सकाळीं
घरातलं सगळं आंवरायला वेळ च
नसल्यामुळं नाष्टा-बिष्टाही
कांही झालेला नव्हता...
पोंटांत
तोपावेतों कावळे कोंकलायला
लागलेले होते...
...
तिकडं
साफ दुर्लक्ष करून आम्ही
खुर्च्यांवर वाट बघत बसून
राहिलो...
...
सव्वा
अकराच्या सुमारास डॉ.
पागे
आले...त्यांनी
आधी बाहेर बसलेल्या परिचारिकेकडं
कांही चंवकशी केली,
आणि
आम्हांला म्हणाले,“
नानिवडेकर
ना ?...या...असे
आत या...डॉ.
कर्नावटांनी
सगळं सांगितलंय मला...तुमचे
सगळे अहवालही मी नजरेखालनं
घातलेत...चला
आत...”
आम्ही
सगळेच त्यांच्या दालनात जाऊन
स्थानापन्न झालो,
न्
डॉ.
पाग्यांनी
सौ.
इंदिराजी
नां तिथल्या तंपासणी मेजावर
आडव्या व्हायला सांगितलं...मग
पृष्ठकण्याचा एम.
आर.
आय.
मागून
घेतला न् तो दीपदर्शकावर लावून
नीट न्याहाळला...दहा
एक मिनिटं त्यांचं निरीक्षण
चाललेलं होतं,
आणि
आम्ही शांतपणे बसून होतो...

शेंवटी
त्यांनी सौ.
इंदिराजीं
चा पाय तंपासून बघितला मग
त्यांना
उठून माझ्या शेंजारच्या
खुर्चीत बसायला सांगितलं,
आणि
सौ.
इंदिराजी
कडं निर्देश करीत बॉंबगोळा
टांकला...
,“
सर...तुम्हांला
इतक्या तंडकाफडकी यांच्या
पृष्ठकण्याची शस्त्रक्रिया
करून घ्यायला कुणी सांगितलं
?”
सौ.
इंदिराजी
नी प्रश्नाला सफाई नं बगल
दिली,“
आम्ही
इथं येण्याआधी एका अस्थिरोगतद्न्यांना
दांखवलं होतं...
कांही
चुकतंय काय यात डॉक्टर ?”
आतां
डॉ.
पाग्यांनी
सौ.
इंदिराजींच्या
प्रश्नाला बगल दिली,
“नाही...म्हणजे
त्याचं काय आहे मॅडम,
की
तुम्हांला जे कांही दुखणं
होतंय ना,
त्याचा
कसलाच कांही संबंध तुमच्या
पाठीच्या कण्याशी असलेला मला
दिसत नाहीय यात,
म्हणून
विचारलं...!!!
असो...
बरं
केलंत...शस्त्रक्रियेच्या
फंदात पडला नाहीत तें...कांही
उपयोग झाला नसता त्याचा...”
आतां
आम्ही दोघांनी त्यांच्या
देंखतच कपाळांना हात लावले...!!!
मी,“...बापरे...मग
हें नेमकं झालंय तरी काय डॉक्टर
?”
डॉ.
पागे
हंसले,“
यांच्या
दुखण्याचं मूळ पाठीच्या कण्यात
नाही,
एव्हढं
मी तुम्हांला ठामपणे सांगूं
शकतो...पण
घाबरून जाऊं नकां...मला
हें पायाच्या मज्जातंतू चं
दुखणं असावं असं वाटतंय...याच्या
वरच्या मजल्यावरच मज्जासंस्था
विभाग आहे...तिथल्या
डॉ.
हलकर्णी
ना मी चिठ्ठी लिहून देतो.
त्यांना
दांखवून त्यांचं निदान काय
येतंय तें बघूं या,
मग
कळेल की नेमकं काय झालंय तें...
...तें जे काय मत लिहून देतील,
तें
मला आणून दांखवा...मग
काय-कसे
उपचार करावे लागतील तें ठंरवतां
येईल आपल्याला...”
तरी
मी सौ.
इंदिराजी
कडं निर्देश करीत आमचं घोडं
दामटलंच...,“
अहो,
पण
तें अस्थिरोगतद्न्य तर सांगत
होते,
की
तांतडीनं शस्त्रक्रिया केली
नाही,
तर
यांना कायमचं अपंगत्त्व येऊं
शकेल म्हणून...”
डॉ.
पागे
फक्त हंसले,“...कांही
काळजी करूं नकां तुम्ही...तसं
कांहीही होणार नाही.
मला
हे मज्जातंतूंचं दुखणं असेलसं
वाटतंय...डॉ.
हलकर्णी
तंपासून तसं कांही असेल,
तर
जरूर ते उपचार पण लगेच सुरूं
करतील...
...ठीक
?...या
तुम्ही...मी
डॉ.
कर्नावटांना
पण कळवतोय माझं मत...कांही
काळजी करूं नकां तुम्ही...”
झालं...आमची
उपाशी पोटीं वरात तशीच वरच्या
मजल्यावर दांखल झाली,
न्
तिथल्या लांबलचक रांगेत पुनश्च स्थानापन्न झाली...
...
तोपावेतों
दुपारचा दीड वाजलेला होता...
... ...
मला
जराशी पेंग आली असावी.
,“
बाबा...अहो
बाबा...उठा
उठा...झोंप
लागली की काय तुम्हांला ?”
मी
पेंग भंगून जागा झालो,
न्
बघितलं तर समोर बापू उभे...
आणि
शेंजारची खुर्ची रिकामी च
दिसली.
मी
चंमकलो,“
आई
कुठाय ?...न्
तूं कधी आलास ?”
बापू,“
आत्तां
च पोंचले इथं...पंधरा-वीस
मिनिटं झालीं असतील...”
मी,“
तुला
हें सगळं कुणी सांगितलं ?”
बापू,“
कुणी
म्हणजे काय बाबा ?...आईचा
च फोन आला होता...तिला
समोरच्या कक्ष्यात नेलंय
कसलीतरी तंपासणी करायला...
...”
मी,“
अगं
पण...अशी
च आत नेलीय तिला ?”
बापू
, " ‘ अशी
च '
म्हणजे
काय बाबा ?...असं
काय करायला लागलाय तुम्ही ?”
मी,“
अगं
सकाळपासून अन्नाचा एक कणही
गेला नाहीय तिच्या पोंटात...”
बापूं
चे डोळे आतां संशयानं बारीक
झाले...,“
आणि
तुमचं काय ?”
मी
फांटा मारला,“
माझं
काय ते जाऊं दे गं...आजारी
ती आहे की मी ?...ऑं
?”
बापू
कांही न बोलतां खांद्याला
लंटकवलेल्या थैलीत खुडबुडले...तीतनं
त्यांनी एक चंपटा डबा बाहेर
कांढला,
न्
झांकण उघडून माझ्या हातांत
दिला...,“
घाईघाईत
थोडे केक हाताला लागले,
ते
आणलेत...खाऊन
घ्या थोडंसं "
मी,“
नको...आई
ला बाहेर आणली,
की
तिचं बघ आधी...मी
घेईन नंतर...”
बापू,“
आई
ला आंत न्यायच्या आधी आल्याआल्याच
मी थोडंफार खायला घातलंय...घ्या
तुम्ही...”
मी,"
आणि
तुझं काय ?
”
बापू,“
मी
येतांना जेवून च आलीय...तुम्ही
घ्या...”
दोन
केक पोटात गेल्यावर जरासं
बरं वाटलं खरं...
बापू,“
हे
पाणी घ्या आतां...तुमच्यासाठी
कोमट पाण्याचा थर्मास भंरून
आणलाय...”
लेकी
च्या मायेनं मला जरा गलबललंच...
इतक्यात
परिचारिका
ढंकल
खुर्चीत बसवलेल्या सौ.
इंदिराजी
ना बाहेर घेऊन आली,“...हं
बसा मॅडम आतां इथं निवांत...तंपासणी
चा अहवाल बघितला,
की
डॉक्टर बोलवतीलच आंत तुम्हांला...”
पांच
दहा मिनिटांनी बोलावणं आल्यावर
आम्ही तिघेही आंत गेलो.
डॉक्टरांनी
सौ.
इंदिराजी
ना तंपासणी मेजावर आडव्या
करून त्यांचा बाधित पाय
निरनिराळ्या हालचाली करून
घेऊन तंपासला,
मग
त्यांना उठून बसायला सांगून
तें परत खुर्चीत बसले न्
अहवालावर नजर फिरवत म्हणाले,“
किती
महिन्यांपासून हा त्रास होतोय
यांना ?”
मी,“
अहो,
महिने
कुठले आलेत...एक
आठवडा झाला असेल जेमतेम...काय
झालंय यानां नेमकं ?”
डॉक्टर,“
आश्चर्य
आहे...झालंय
असं,
की
यांच्या गुडघ्यापासून खाली
पायाकडं जाणारी नस खराब झालेली
आहे,
म्हणून
यांना हा त्रास सुरूं झालाय...पण
एक आठवडाभंरात नस इतकी खराब
सहसा होत नाही,
म्हणून
जरा आश्चर्य वाटलं मला,
इतकंच...”
मी
तो च धागा पकडला,“
इतकी
म्हणजे कितीशी खराब डॉक्टर
?...जरा
समजेलसं सांगतां येईल ?”
डॉक्टर,“
साधारण
सत्तर टक्कयांच्या आसपास
म्हणतां येईल...”
आतां
मला जरा ताण जाणवायला लागला,“...मग
आतां पुढं काय ?”
डॉक्टर,
“ कांही
नाही...मी
नसेला पोषक अशी तीन औषधं लिहून
देतोय,
तीं
चार महिने घ्या,
सोबत
लिहून दिलेले तीन आठवड्यांसाठीचे
विद्युच्चेतनादायक उपचारही
शारीरिक
व्यायामतद्न्याकडून करून
घ्या,
आणि
चार महिन्यांनी परत मला
दांखवायला या...”
मी,“
डॉक्टर...मला
दोन प्रश्नांची स्पष्ट उत्तरं
हंवीत...जी
काय असतील तीं...”
डॉक्टरांनी
फक्त मान डोलवली,“
हं...विचारा
काय डोक्यात असेल तें...”
मी
मग त्यांना मुलगा-सूनबाई
परदेशीं असतात...आम्ही
दोघे च घरात असतो...इत्यादि
सगळं सांगितलं,
न्
मग विचारलं ,“
डॉक्टर...मला
असं सांगा,
की
हें जे काय यांना झालंय...तें
शंभर टक्के पूर्णपणे बरं
होऊन ह्या परत नैसर्गिकपणे
हिंडूंफिरूं शकतील की नाही
?...आणि
तसं होणार असेल,
तर
किती काळ यांना औषधं घेत त्याची
वाट बघावी लागेल...?”
डॉक्टर
आतां मात्र जरासे दुग्ध्यात
पडले,
न्
क्षणभंरानं कक्ष्याच्या
छताकडं हात उंचावत उत्तरले,“
स्पष्टपणेंच
सांगायचं,
तर
नसांचे बहुतांशी विकार असेच
असतात,
की
या तुमच्या दोन्ही प्रश्नांची
छातीठोंक उत्तरं कुणीही तद्न्य
देऊं शकणार नाही...
...मी
स्वतःही देऊं शकत नाही...
औषधं
घेत राहून फक्त वाट बघणं,
आणि
या पूर्ण ब-या
होतील अशी आशा न सोडणं,
एव्हढंच
आपल्या हातांत असतं...गॉड
ईज ग्रेट ...”
डॉक्टरांचं
तें विधान ऐकून आपसूकच मी न्
सौ.
इंदिराजीं
नी एकमेकांकडं वळून बघितलं...
...
आणि
सौ.
इंदिराजींच्या
नजरेत जे कांही मला दिसलं,
त्यानं
मी खंरोखंरीच अंतर्बाह्य
चंरकलो...
मुळातच
कणखर स्वभावाच्या सौ.
इंदिराजीं
च्या नजरेत मला हंताश खंचलेपणाची
भावना स्वच्छपणे दिसलेली
होती...
...!!!
रुग्णालयातलं
काम झाल्यावर बापू त्यांच्या घरीं परतायच्या घाईत असल्यामुळं
'
आतां
निवांत घरीं जा तुम्ही...उद्यां
सकाळीं फोनवर बोलून पुढं
कसं-काय
करायचं,
तें
ठंरवूं ...’
इतकं
सांगून निघून गेले,
आणि
मी सौ.
इंदिराजी
ना गाडीत घालून यंत्र चालूं
करायची चावी फिरवली...
...
घरीं
परतल्यानंतर सौ.
इंदिराजी
नी मातोश्रींच्या चरणीं कुंकू
वाहून मस्तक टेंकलं,
आणि
मूकपणेच कपडे बदलायला त्यांच्या
शयनकक्ष्याकडं निघून गेल्या...
काय
झालंय तें मला बरोबर समजलेलं
होतं...
...
मी
मग शांतपणे संध्यास्नान आंवरून
मातोश्रीं चा
गायत्री केला,
न्
त्यांच्या चरणीं
डोकं टेंकलं...
,“
मातोश्री...”
मातोश्री,“...आलास
?...ये
बस असा माझ्याजंवळ...कां
हांक मारलीस मला ?...काय
हंवंय ?”
मी
कांही न बोलतां मातोश्रीं चा
उजवा वरदहस्त धंरून माझ्या
मस्तकावर ठेंवला...
...
मातोश्री
मंद हंसल्या,“
हें
मी तुला कायमच देत आले आहे ना
रे...
...”
मी,“
होय
मातोश्री...”
मातोश्री,“
मग
आतांच्या तुझ्या या कृतिमागचं
कारण ?”
मी,“
भक्कम-कणखर
इंदिराजी च खंचायला कश्या
लागल्यायत तें कळत नाहीय
मला...
तुमचंच
रूप आहे ना तें ?...मग
त्या च अश्या खंचून गेल्या...तर
हें धर्मयुध्द मी कुणाच्या
पांठबळावर लढायचं...?”
मातोश्री,“
तें
माझंच रूप असलं,
तरी
मानवी मर्यादा-विकार
असतात त्याला...त्यात
नवल तें काय ?”
मी,“
मग
काय करूं मी असा एकटाच रणांगणावर
उतरून ?”
मातोश्रीं
च्या कमानदार भिवया जराश्या
वर गेल्या,“...
तुझ्या
पांठीशी सदैव असलेल्या माझ्या
'
तथास्तु
'
ची
खात्री वाटेनाशी झालीय की काय
तुला...?”
मी
कळवळलो,“
तसं
कांही नाही मातोश्री...”
मातोश्री,“
...तसं
कांही नाही ?...मग
आतांच्या तुझ्या कृति चा अर्थ
मी काय लावायचा ?”
मी,“
क्षमस्व
माम् मातोश्री...
...मस्तक
भिरभिरलंय माझं...”
मातोश्री
आतां परत मंद हंसल्या...
...
मी,“
तुम्ही
च सांगा आतां...मी
काय करूं ?”
मातोश्री,“
तुला
चांगलं ठाऊक आहे मला काय
म्हणायचंय तें...तुझं
हें धर्मयुध्द लढायला आवश्यक
तीं सगळीं शस्त्रास्त्रं
तुला दिलीत मी...होय
ना ?”
मी,“
होय
मातोश्री...
...दिलीत...पण
तींही पराजित झालीत काय तें
च कळेनासं झालंय...
...म्हणून
तर इतरांना मैदानात उतरवायचा
उद्योग करायला गेलो...तर
तिथं पण पराभंव च दिसायला
लागलाय...काय
करूं मी दुसरं अजून ?”
मातोश्री,“
शस्त्रास्त्रं
कधीच पराभूत होत नसतात
बाळा...पराभूत
होतात ते शस्त्रधारी...
...तुला
हें कळायला हंवं होतं...
...”
मी
आतां मातोश्रींपुढं ओंणवा
झालो,“
घाला
तुम्हांला काय दंणके घालायचे
असतील तें...पण
मातोश्री...इंदिराजींची
खंचलेली भकास नजर काळीज चिरत
जातेय माझं ...
...तें
पण तुम्ही च तर प्रदान केलंय
ना मला ?...आतां
तुम्ही च सांगा...काय
करूं मी त्या काळजाचं ?”
मातोश्रीं
चा उजवा मखमली तळवा हंळुवार
पाठीवर फिरला...
...
,“
छान...वाग्युध्दांतही
तंरबेज आहेस की...ऊठ...ये
बस परत असा माझ्याजंवळ...”
मी,“
तुमचा
'
तथाSस्तु
'
हें
च तर माझं अखेरचं श्रद्धास्थान...त्याची
मला नुस्ती शंकासुध्दां कधी
आलीय
मातोश्री ?”
मातोश्री
आतां प्रसन्नपणे हंसल्या,“
ठाऊक
आहे मला तें...”
मी,“
मग
'
आतां
काय करू ?’
ही
पृच्छा करायला मी कुठं जायचं,
तें
तरी सांगाल मला ?”
मातोश्री
नी आतां आकर्ण हंसत माझा करकंचून
गालगुच्चा घेतला...,“
लबाड
कुठला...तुला
प्रदान केलेलीं शस्त्रास्त्रं
उचल परत,
आणि
रणांगणावर धरणीत पाय गाडून
उभा रहा परिस्थितीसमोर...सगळं
मंगलमय
होईल...
..." !!!
मी
उठून मातोश्रीं च्या चरणीं
मस्तक टेंकलं,“
येतो
मातोश्री...”
मातोश्री
प्रसन्न हंसल्या ,“...तथाSस्तु
”
मी
उठून
तसाच
सौ.
इंदिराजीं
च्या कक्ष्यांत गेलो...
त्या
समोरच्या भिंतीकडं शून्यात
नजर लावून बसलेल्या होत्या...
...
मी,
त्यांचा
चेहरा हंळुवारपणे हातांत
धंरून माझ्याकडं वळवला,“
काय
झालंय तुम्हांला...सांगतां
मला ?”
सौ.
इंदिराजीं
च्या डोंळ्यांत पाणी तंरळलं,“
काय
होईल हो आतां माझ्या घरादाराचं
?”
मी
त्यांच्या डोळ्यातलं पाणी
अंगठ्यांनीच पुसलं...
,“
कांही
बिघडणार नाहीय आपलं इंदिराजी...नाही
ना कुणी डॉक्टर तयार तुमचा पत्कर घ्यायला ?...
...हंरकत नाही...मी
घेतो सगळी जबाबदारी...मलाही
बघूं दे जरा, हें
दुखणं किती टिकाव धंरतंय
तें...काय
?...उद्यां
सकाळीं सांगतो तुम्हांला
पुढं काय करायचं तें...चालेल
?”
सौ.
इंदिराजी
आतां जरा निवळल्या...
...
मी,“
खात्री
बाळगा...कांहीही
नको तें होणार नाहीय तुमच्या
संसाराचं...ठीक
?”
सौ.
इंदिराजी,“
मातोश्रीं
ची गांठ पडली की
काय
?”
मी
फक्त हंसलो...
...
मग
त्याच रात्रीं भोजन उरकून
होमिओपॅथीचे सगळे संदर्भ
कांढून ठिय्या मारला...सौ.
इंदिराजींची
डोंक्यापासून पावलांपर्यंतची
तमाम प्राकृतिक लक्षणवैशिष्ठ्यं
नीटपणे परत अभ्यासलीं,
आणि
त्यांच्याशी जुळणारी दोन
औषधं अखेर सापडलीं...
तीं
दोन्ही औषधं दुस-या
दिवशीं सकाळी त्यांना दुकानातनं
आणून दिली,
न्
सांगितलं,“
हलकर्णी
डॅक्टरांनी दिलेल्या गोळ्या
चार महिने न चुकतां घ्याच,
पण
त्याबरोबर हीं दोन औषधंही
व्रत घेतल्यासारखी रोज रात्रीं
झोंपतांना घ्यायची...मी
बंद करायला सांगेपर्यंत...आणि
सांगितलेले सगळे पावलांचे
व्यायामही दररोज न चुकतां
करायचेत तुम्हांला...
समजलं
सगळं नीट ?”
सौ.
इंदिराजी
नी होकारार्थी फक्त मान
हंलवली...
या
घटनेला आतां सहा महिने उलटून
गेलेत...
...
होमिओ
औषधं सुरूं केल्यापासून तीनेक
महिन्यांत सौ.
इंदिराजी
खाली लोंबणारं पाऊल नीट सांवरून
धंरीत नैसर्गिक चालीनं चालायला
तर लागल्याच,
शिवाय
गेल्या आठवडाभंरापासून स्वतः
च दुचाकी चालवत पहिल्यासाख्या
पुनश्च बाहेर हिंडाफिरायलाही
लागल्यायत...
... ...
अजून
कुणाला कांही शंका...
...?
मास्तरांच्या
'
नॉलेज
ईज पॉवर '
बद्दल
?
आणि
मातोश्रीं च्या '
तथाSस्तु
'
बद्दल
तरी ?
****************************************************************
--
रविशंकर.
१७
फेब्रुवारी २०२६.